सहज विकत घेता येणार नाही
असं एक पुस्तक
तो देऊनच पाठवतो…
त्यातले नायक आपण
अन कथाकार तो असतो…
छापणाऱ्याची विरामचिन्हे
हा आपल्या
काळजीचा विषय असतो…
कारण त्याच्या चुकीच्या पुज्यामुळे
आपला विषय
संपणार असतो…
बरं… हे पुस्तक काही
सगळंच छापून
तो देत नसतो…
पुढल्या उरलेल्या
कोऱ्या कागदांचा
तो हुकुमी पत्ता
राखून असतो…
काही जुनी कहाणी वाचावी
म्हणून तोच कधी
मागची पाने चाळत असतो
आपण मात्र
नायक म्हणून
मुकाट अतितात झुरत असतो…
कधी तोच काही पाने
सर्र्कन वाऱ्याने
पालटत असतो
वाचनासाठीची
दुमडली पाने
तशीच खुणेसह विसरत असतो…
त्याचं पुस्तक
लिहून होतं
शेवट बऱ्याच टिंबांचा असतो
ह्याचा अर्थ हे कथानक
त्याच्या हिशेबांनुसार
पुन्हा रचणार असतो…
सहज विकत घेता येणार नाही
असं एक पुस्तक
तो देऊनच पाठवतो… !!!
- Oms
१६-०९-२०१४
००:१६ मि.